अगदी खोलवर गाडलं गेलेलं
ना हवा, ना पाणी
वरती सग्गळं काही सुरळीत, आलबेल
शंकाही यायला नको त्याच्या अस्तित्वाची....
पण तू परवा जो नांगर फ़िरवलास ना, सगळ्यावरुन!!
कानाकोपरा नाही ठेवलास शिल्लक....
ते जाऊदे, जखम तर नाहीच उरली आता
कोवळे अंकुर बघ कसे आलेत उगवून.........
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment