शब्दार्थ
एकेका शब्दाशी असं नातं जोडलं होतं म्हणुन सांगू!!
की मृदगंध म्हटल्यावर डोळ्यांनी आपोआप मिटावं
आणि राउळ स्मरल्यावर हातांनी जोडलं जावं
धुकं आठवल्यावर नाकाचा शेंडा ओला व्हावा
'सय' म्हटलं की हृदयात उठावा असा कालवा
आता शब्द नाही वाटत माझे, तिथं नातं कुठलं सांगू?
आता मोहोर आठवुनही मन नाही येत फ़ुलुन
आणि वसंत दाटुन आला तरी जातं कोमेजुन
या सगळ्या द्वंद्वात अपवाद फ़क्त एकाच शब्दाचा उरतो
तुझी एकदा जरी झाली आठवण, जीव कासावीस होतो....
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
apratim!
Post a Comment